मला समजलेली ’गोजीबाई’ - कथामंजीरी ४ मधील मुख्य पात्र

(Generated By Using Meta AI Not A Real Image.)
कथामंजिरी ४ मधील गोजीबाई हे कॅरेक्टर माझ्या मनात घर करुन गेले. 
या गोजीबाईबद्दल काही मुद्दे 
  ही गोजिरी, गोजीरवाणि सुंदर आहे. जिच बालपण सातार्‍यात गेले आहे. सख्खी ८ भावंडे आहेत. ७ वी पर्यंत शिकलेली आहे. इंग्रजीची आवड असणारी आहे. अभ्यासाची आवड असणारी आहे. जीचे वडील वारकरी आहेत. तीला भजनाची सवय आहे. हार्मोनियम वाजविता येतो. अभंग १००च्यावर पाठ आहेत. काशीनाथ पाटलाबरोबर विवाह झालेला आहे आणि तिला दोन मुली व एक मुलगा आहे. 
  जिची हरिहरावर नितांत श्रद्धा आहे. जिचे आजूबाजूचे निरिक्षण करण्य़ाची क्षमता उत्तम आहे. जी सावध आहे. जिच्या निती अनितीच्या संकल्पना, पातिव्रत्याच्या संकल्पना स्पष्ट आहेत. ती अत्यंत प्रॅगमॅटीक आहे. तिच्यात एका पुरुषाला समर्थपणे दोन लगावून देण्याची शारिरीक आणि बौद्धीक क्षमता आहे. तसेच ती एक उत्तम अभिनय करु शकते. एखादी कला, गोष्ट आत्मसात करण्य़ाची तीची क्षमता अफाट आहे आणि आत्तापर्यंतच्या कोणत्याही भागात ती स्वतः न्यूनगंडात असल्याचे जाणवले नाही. 
  हा भगवान त्रिविक्रम माझ्याकडून सर्व काही करुन घेईल. हा तिचा विश्वास मात्र दिसून येतो. त्यामुळे अवघडातील अवघड कार्य तीला शक्य झाले आहे. स्वसंरक्षण कसे करावे याबाबत ती पूरेपूर जाणते. प्रसंगावधान तर आहेच पण थोड्याच काळात पटकन निर्णय कसा घ्यायचा हे तिला सहज जमते. 
  असे अनेक गुण गोजीबाईचे कथामंजिरीत दिसून येतात. एका गावाकडच्या साध्या बाईचे हे कॅरेक्टर बापूंनी आपल्या समोर उभे करुन, आपल्यालाएक खुप मोठा आधार आणि बळ आहे अस मला वाटते. त्यात पहिला गुण म्हणजे तर्क कुतर्क मनात न आणता हरिहरावर अचाट श्रद्धा आणि त्याच्याशी सतत संवाद करत राहणे. आपण या देवाची लेकरे आहोत म्हणुन स्वतःच्या क्षमतेवर कधी अविश्वास दाखवयचा नाही कारण हा त्रिविक्रम आपल्याकडून काहीही करुन घेऊ शकतो हे तिला ठाऊक आहे.
  या कथामंजिरीत एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे गोजीबाईने घेतलेला प्रत्येक निर्णय हा तिच्या भगवंताला साक्षी मानून घेतलेला आहे. यासाठी तिने आजूबाजूच्या परिस्थीतीचा अभ्यास केलेला आहे. काही घटनांमध्ये गोजीबाईने कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि निर्णयशक्तीचा केलेला पूरेपूर वापर दिसून येतो. 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा हरि येईल आणि सर्व करेल अश्या भ्रमात ती कुठेही ती नाही दिसली. हरी माझ्यासोबत आहेच ह्या विश्वासाने तीने प्रत्येक पाऊल उचलेले दिसत आहे. 
  श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज सत्यप्रवेशामध्ये बापू म्हणतात, 

आपल्या जीवनाला भयमुक्त करण्यासाठी आवश्यकता असते, ती विवेकबुद्धीचा वापर करुन योग्य निरिक्षणाद्वारे उचित निर्णय करण्याच्या अभ्यासाची. ही गोष्ट सरावानेच प्राप्त होते. परंतु त्यासाठी लागणारे बळ मात्र श्रद्धेपोटीच जन्म घेते. पवित्र तत्वांवर असणारी श्रद्धा.

कथामंजिरीमध्ये ही गोष्ट अधोरेखित होते आणि नेमक हेच गोजीबाई करताना दिसते. गोजीबाईबरोबर राहून तीच्या मुली व मुलगा तेही तल्लख होताना दिसतात. काशीनाथरावांचे पण असच आहे. हे कुटुंब त्यांच्या जीवनात ठाई ठाई श्रीमद्पुरुषार्थ अवलंबिताना दिसतात. 
श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज सत्यप्रवेशामध्ये चरण ४१ आपल्याला सावधपणा संगते.

 प्रपंच असो की वैराग्य, भक्त असो की अभक्त, ह्या मानवी जीवनात दर क्षणाला सर्वात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे ’सावधपणा’ 


हा सावधपणा मला गोजीबाईमध्ये ठाई ठाई दिसतो. 
आणि पुढे चरण ४१ मध्ये म्हटले आहे की, 

मी सावध असेन तरच मी घडणार्‍या घटनांचा अर्थ नीट समजून घेऊ शकतो व माझ्याशी संबंधीत गोष्टींचा नीट अर्थ कळला तरच मी सावधपणे पुढील हालचाल करु शकतो.
गोजीबाई सावध असल्याने तीला उचित तो मार्ग सापडत राहतो. 
असे काही मुद्दे मला सुचत होते गोजीबाई अभ्यासताना म्हणून ते एकत्रित करण्याचा प्रयास केला. 

पिपा म्हणे सोडा घाई,
 शिक्षण अनिरुद्धाच्या पायी

एका स्त्रीने समाजत कसे असावे, कोणत्या माईंडसेटने वावरावे, कोणते गुण अंगीकारावे, हे सर्व काही गोजीबाईच्या कथेतून बापू स्पष्टपणे मांडत आहेत. तसे व्यक्तीमत्व स्वतःचे घडवू शकलो तर या कलियुगात प्रत्येक स्त्री समर्थ होऊ सकते आणि तिच्या पाठीशी तिचा हरिहर नक्की उभा असेल. कारण या कलियुगात आपले युद्ध आपल्यालाच लढायचे आहे. असे मला वाटते.

- रेश्मावीरा नारखेडे
ThinkBigReshma

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Khupch chaan
Mukund Waghmode म्हणाले…
अप्रतिम,एकदम हुबेहूब गोजिबई Keep it up Ambadnya Shriram Nathsanvidh
अनामित म्हणाले…
हरि ओम एक सक्षम मेहनती स्वावलंबी चांगल्या विचारांची ती स्त्री वीरा गोजीबाई कथेतून आम्हाला दिसली आणि त्यातून तुम्ही रेशमावीरा ही पोस्ट प्रकर्षाने सर्वांपर्यंत असे चांगले विचार ही कथा पोचवतात खूप छान वाटलं अंबज्ञ नाथसंविध् 🙏🏻
अनामित म्हणाले…
ही गोजाबाई ही आपल्यातील वाटते, वैवायिक जीवन जगताना परमेश्वराच नामस्मरण करत सदैव जाग्रृ त रहायला शिकवते.
अनामित म्हणाले…
ही गोजाबाई ही आपल्यातील वाटते, वैवायिक जीवन जगताना परमेश्वराच नामस्मरण करत सदैव जाग्रृ त रहायला शिकवते.
अनामित म्हणाले…
Hari om khup chan
अनामित म्हणाले…
Ambadnya
अनामित म्हणाले…
Khrch khup chan Lihiley..... Reshamaveera aani he vachun Gojibai ch character ajun spasht hot....khup chan....👍👍
अनामित म्हणाले…
Khupch chaan aahe Love you Dad
अनामित म्हणाले…
एकदम अभ्यासपूर्ण लिखाण, सखोल निरीक्षण, साक्षात गोजीबाई नजरेस आली .खुप छान वाटलं
श्रीराम अंबज्ञ नाथसंविध विरा
अनामित म्हणाले…
सदगुरु श्रीअनिरूद्धांनी आपल्याला लाखों अनुनाकियांचा ईतिहास आपल्या समोर आणला ( अत्यंत प्राचीन भुतकाळ ) व आता अत्यंत जवळचा , आत्ताच्या काळातील गोजीबाईची कथा समोर आणली. भविष्यात काय घडु शकत हे तिसरे महायुद्ध पुस्तकात सांगितले आहेच . आणी म्हणुन त्यांची ग्वाही आहे " सांगाती आहे मी तुमचा तीनही काळ"
अंबज्ञ, नाथसंविन
अनामित म्हणाले…
Ambadnya गोजीबाईचा कॅरेक्टर इतक्या सविस्तर रित्या मांडून आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी
अनामित म्हणाले…
यथार्थ वर्णन, प्रसंग,गुण विशेष apt.ambadnya
अनामित म्हणाले…
गोजावाई बदल खूप सुंदर लिहिले आहे आपण कस चाणाक्ष्य असलं पाहिजे हि समज बापूंनी दिली आहे ह्या कथेतून व तुम्ही ती खूप सुंदर रित्या त्यातली सांगता आहे खूप खूप सुंदर
अंबज्ञ
अनामित म्हणाले…
खूपच सुंदर रश्मी वीरा. आपण खूप सुंदर अभ्यास केला आहे गोजिबाई चा. खूप छान वाटले. आणि काही गोष्टी समजण्यास मदतच झाली. खूप खूप अंबज्ञ . दैनंदिन जीवनात देखील महिलांना खूप गोष्टींना सामोरे जावे लागते. गोजिबाईंच्या गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आहे. अंबज्ञ.
अनामित म्हणाले…
खूप सुंदर अभ्यास केला आहेस रेश्मा विरा . अंबज्ञ

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात...

आमचा बापू लय भारी...आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी (भाग ३)

आधी ते सावधपण - मला समजलेली गोजीबाई भाग २