हरि ओम,
धपा धप तीन भाग लिहून झाले....जरा चौथ्या भागासाठी वेळ घेतला...मुद्दामूनच घेतला...कारण आता परेडसारख्याच अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी वळणार आहे....रेस्क्यु प्रॅक्टीस...
परेड काय आहे....आणि रेस्क्यु प्रॅक्टीस काय? याचा मी नेहमी विचार करायचे...यातील जास्त महत्त्वाचे काय? .हा प्रश्न मला एकाने विचारला होता..मला उत्तर तेव्हा देता आले नाही...पण आज मी हे उत्तर देते...माझ्यामते, परेड आणि रेस्क्यू प्रॅक्टीस ही दोन्ही ए ए डी एमची विभक्त नसलेली जुळी बाळे आहेत...एकाशिवाय दुसरे राहू शकत नाही...दोघेही एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी एका डीएमव्हीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फक्त थॊडासा फरक जर करायचा झाला तर परेड हे साध्य नाही...साधन आहे...तर रेस्क्यु प्रॅक्टीस किंवा रेस्क्यु हे साध्य आहे...मी परेड का करायची तर....रेस्क्यु ऑपरेशनसाठी सदैव फिट रहावे म्हणून....म्हणजे जस आपल्या देशाचे सैनिक सीमेवर लढतात...ते त्यांचे कार्य असते...अगदी तसच...DMV चे आहे...अस मला वाटत...ते सीमेवरील आपत्तीशी लढतात....आपले काम सीमेआत येणार्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीशी लढणे आहे...आता लढणे म्हणजे आगाऊपणा करत पुढे पुढे करण आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं नाही...तर आपल्या सरकारी यंत्रणांना (पोलीस द्ल, अग्नीशामक दल इत्यादी) त्यांच्या कामात पूर्ण सहकार्य करणं...कोणतीही आपत्ती उदभवू नये याची दक्षता घेणं...हे सगळ मी या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून करायच...आणि ते उचित पद्धतीने करता याव...यासाठी ए ए डी एमचा डी एम व्ही होण गरजेच आहे....नाही तर काही तरी वेड्यासारख करायच आणि आपत्ती निवारण करण्या ऐवजी आपत्ती वाढवून ठेवायची...याच सगळ्यात मोठ्ठ आणि तापदायक उदाहरण म्हणजे "अफवा" पसरविणे....असो...मला काय म्हणायचे ते कळलेच असेल तुम्हाला...नसेल तर यावर आपण पुन्हा कधी तरी सविस्तर बोलू...आता वळूया आमच्या भन्नाट रेस्क्यू प्रॅक्टीसकडे....
तर परेडच्या रेस्क्यु प्रॅक्टीसकडे वळण्याआधी केंद्रावरील रेस्क्यु सरावाची थोडीशी मज्जा सांगते...केंद्रावर आमचा ए ए डी एम चा मस्त ग्रुप होता...मला अजूनही आठवतय...सगळे झपाटलेले होतो तेव्हा...मी, आशिष भाई, सुनि ताई, प्रसाद, प्रतिभा, भक्ती, निलेश, पराग इत्यादी...वेड लागल्यासारखा सराव करायचो...हीच आमची वसईची रेस्क्यु मेन टीम होती...आशिष भाई म्हणजे आशिष सोलंकी याने आम्हा सर्वांना बांधून ठेवलेले...अरे बांधून ठेवलेले म्हणजे एकत्र बांधून ठेवलेले...आज सगळे वेगवेगळ्या सेवेत सहभागी झालेले असलो तरिही त्या आठवणि ताज्या आहेत... खूप प्रॅक्टीस करायचो...मी तेव्हा अत्यंत बारीक होते आणि वजनाने तर एकदम फूलच होते...त्यामुळे प्रत्येक प्रॅक्टीसला माझा हमखास बळी जायचा...म्हणजे सर्व जण मला कॅज्युलटी म्हणून वापरायचे...ही झाली केंद्राची रेस्क्यु टीम..दुसरी अजून एक टीम होती...बोरीवली ते विरारमधील अती ऍक्टीव्ह डीएमव्हींची..यामध्ये मला फारशी नावे आठवत नाहीत पण मी, सुनी ताई, प्रसाद, शैलेश धुरी, अनिकेत कोळंबकर, सचिन सरैय्या, निलेश पोवळे असे बरेच जण होतो...अरे काय धम्माल केली आहे आम्ही...बोरीवली ते बोईसर दरम्यान कुठेही ए ए डी एम चा कोर्स असला की जायचो आम्ही...सोबत...अरविंदसिंह नातू (नातू काका), जाधव काका, अशोकसिंह वर्तक हे कधीतरी असायचे मार्गदर्शन द्यायला...सगळे जण या तिघांना जाम टरकायचे..पण हे तिनही काका आम्हाला छान मार्गदर्शन करायचे...खूप शिकायला मिळाले यांच्याकडून...खूप छान मोटीव्हेशन द्यायचे...मला सगळ्यात जास्त भिती नातू काका आणि वर्तक काकांची वाटायची...ते गुगली प्रश्न विचारायचे...ते दिसले की मी लांब पळायची...पण आता नाही घाबरत :). एकदा नातू काकांनी मला विरारला चालेल्या प्रॅक्टीस दरम्यान प्रश्न विचारला..मी त्याचे उत्तर दिले तर त्या उत्तरावर पुन्हा प्रश्न विचारला..बापरे मी नंतर उत्तरच दिले नाही पुढचा प्रश्न येईल या भितीने...प्रश्न नेमका आठवत नाही पण तेव्हा ते म्हणाले होते की एका डीएमव्हीचे G K पक्के पाहीजे...त्याला सगळ्या चालू घडामोडींची माहीती पाहीजे. तेव्हा पासून मी तस स्वतःला शक्य तितके अपडेटेड ठेवायला लागले...आणि त्याचा आत्ता खूप फायद झाला...Thank You Very Much Natu Kaka...त्यानंतर वर्तक काकांनी मला पाणजू येथे झालेल्या कोर्सला प्रश्न विचारला सगळ्यांसमोर...रेश्मा आता तू इतक करतेस सेवा आणि AADM पुढे लग्न झाल्यावर काय करणार? तुझ्या नवर्याने नाही पाठवल मग? तेव्हा मला खूप भिती वाटली. खरच अस झाल तर...पण मी ठामपणे उत्तर दिले...नवरा सोडेन बापूंची सेवा नाही....यावर त्यांनी माझ्याशी खूप वाद घातला..(हा वाद माझ्या भल्यासाठीच होता हे मला पक्के ठाऊक होते) पण मी ठाम होते...आजही आहे...पण खरच त्यांनी त्या दिवशी विचारलेल्या प्रश्नाने माझे विचार बदलू लागले...आणि खरच मला काय हवय...आणि काय नकोय याची एक चौकट बनू लागली...पण ही चौकट माझे बंधन नाही बनली...आणि या मर्यादेच्या चौकटीत राहूनच प्रगतीच्या दिशेने माझा जोमाने प्रवास सुरु झाला...जो आजही सुरु आहे..तेव्हा माझे वय १९/२० असेल..हे सगळ सांगायचा मुद्दा असा की, ए ए डी एम आणि परेड या सारख्या सेवांमध्ये फक्त मी सहभागी नाही झाले..तर या सेवा करताना अनेक बाबींतून मी घडत गेले...या सेवे दरम्यान संपर्कात आलेल्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखे होते..ते मी शिकले...त्यामुळे या बापूंच्या कार्यात झोकून दिल्याने माझ कुठही नुकसान झाले नाही. अनेकांनी मला वेड्यात काढले...अगदी नातेवाईकांनी सुद्धा...बापूंच्या सेवेत आणि या नसत्या उद्योगात सहभागी होऊन तुला काय मिळणार आहे? काय उपयोग याचा? अशा प्रश्नांचा भडीमार व्हायचा...पण असे प्रश्न झेलण्याची ताकद बापूंनी दिली. तेव्हा त्यांना मी उत्तरे दिली नाहीत...आणि आज पुन्हा त्यांच्यात हे प्रश्न विचारण्याची हिम्मत नाही...ह्यालाच म्हणतात खरा "बापूंचा चमत्कार"
तर असो,
आम्ही मचाण बांधण्यापासून ते मोडण्यापर्यंतचे आणि या दरम्यान डेमॊ दाखविण्याचे सर्व उद्योग करायचो..सचिन सरैय्या, निलेश, शैलेश, प्रसाद हे सगळे मचाण बांधण्यात पुढे असायचे..एकदा तर सगळे मचाणावर चढलो...आणि पडतय की काय अस झालेल...पण बापू कृपेने नाही पडले...आणि आम्ही सगळे सुखरुप होतो...वसईलाच झालेले हे बहुतेक...आम्ही रेस्क्युच्या काही नविन पद्धती देखील शोधून काढल्या होत्या..अभ्यासक्रमाच्या बाहेरील....हा हा हा....काय भन्नाट डोकी चालायची आमची..केंद्रावर रेस्क्यु प्रॅक्टीस जोरदार चालली होती...मध्येच आम्ही कांदीवलीला एका शाळेत सरावाला जायचो...तिथे त्या बैठ्या शाळेच्या छपरावर जायचो आणि तिथून सेफ जंपचा सराव करायचो...मी एकदाच मारली जंप..बाबारे!!!...लय भिती वाटायची जंप ला...लॅडरने चढणे उतरणे वैगरे...त्यानंतर दहिसरच्या मैदानात सराव सुरु झाला...येथे तर धम्माल यायची..प्रसाद धुमाळी, सत्या..वैगरे दहिसरचे डीएमव्ही येथे एकत्र सराव करायचो...
इकडची एक गम्मत आठवतेय...दहिसरचे हे ग्राऊंड जरा गवताळ होत...त्यामुळे इथे सराव करताना फार प्रसन्न वाटायच...रात्री ७ / ७:३० नंतर सराव चालायचा. आम्ही इथे कॅज्युलटीला स्ट्रेचरवर घ्यायचो त्या ग्राऊंडला चक्कर मारायचो. एक किंवा दोन..मला हे सगळे सारखे कॅज्युलटी बनवायचे...त्यामुळे इथे माझा सराव कमीच व्हायचा...खर सांगू मी कुणाला उचलू शकेन अस कुणीच नव्हत तिथे...आणि मी परेफेक्ट कॅज्युल्टी असायची....डीएमव्हीला अजिबात सहकार्य न करणारी...अंगच टाकून द्यायची मी मला हॅण्डल करणार्या डीएमव्हीवर...मग मज्जा यायची त्यांची...असो...तर एकदा सगळ्या मुलींनी मला रोप स्ट्रेचरवर उचलले. त्यांनी बरोबर उचलले नव्हते...एक राऊंड झाल्यानंतर त्यांनी मला खाली ठेवले. खाली ठेवताना माझ डोक आपटले...माझा श्वासोच्छावास बंद होता..अंग थंड पडले होते...डोळे वर गेले होते...ठेवल्यानंतर मी उठेनाच...सगळे घाबरले...भक्ती हरचेकर माझी चुलत चुलत बहीण ही माझ्या डोक्याजवळ होती स्ट्रेचर धरायला. ती घाबरली. तीने मला गदा गदा हलविले मी उठली नाही...बाकीच्यांनी हात पाय चोळायला घेतले..भक्ती खूप घाबरली..शेवटी तिने थोबाडीत मारायला सुरुवात केली मला. एक...दोन...तीन..फटाफट...दहा तरी मारल्या असतील तिने...शेवटी मला सहन नाही झाले....आणि मी म्हटल बस!!!! आले मी शुद्धीवर...आणि हसायला लागले..हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
मी नाटक करीत होते..पाचच मिनिटाचे होते...पण सगळ्यांचे धाबे दणाणले होते...मी मस्त त्या गवतावर पहडून सगळ्यांकडे पाहत होते हसत...सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते..भक्तीचे पाण्याने डबडबले डोळे पाहून मला हसूच आवरेना...मग माझी वाट लागली...सगळ्यांनी असले धुतलय मला!!!...भक्तीने तर गळाच धरला..सुनिताईने चांगलेच धपाटे घातले...मुलांनी तर त्यांच्या वतीने माझ्या कमरेत लाथ घालायला सांगितली..तुडव तुडव तुडवला मला..आणि वॉर्निंग दिली..पुन्हा अस करायच नाही...सगळ्या डीएमव्हींची..हुशार डीएमव्हीची तेव्हा फाटली होती..मला जाम हसू येत होत..मग सगळे शांत झाल्यावर मी त्यांना म्हटल तुम्ही सगळ्यांनी चुकीच्या पद्धतीने मला उचलल होत...त्यामुळे माझा पाठीचा कणा कामातून गेला असता..शिवाय माझ डोक ही आपटल...कितीला पडल असत हे एका कॅज्युलटीला...म्हणून मी मुद्दामुनच नाटक केले...हा हा हा हा...
त्यांना पण हे लक्षात आल...पण पुन्हा मी अस करणार नाही अस वचन दिल्यानंतरच त्यांनी मला माफ केल..मी पण अस पुन्हा कधी केल नाही...नाहीतर लांडगा आला रे आला झाल असत माझ..आणि माझ्याही चुका होतच होत्या की...पण एक गोष्ट यानंतर छान झाली ती म्हणजे मी कॅज्युलटी म्हणून नाकारले जाऊ लागले झाले...कुणीही चालेल रेश्मा नको....हा हा हा....
असो तर अशी धम्माल करीत चालायचा आमचा रेस्क्यु सराव...त्यानंतर माझी निवड परेडच्या रेस्क्यु टीममध्ये झाली...आणि इथे तर सगळ भन्नाटच होत....आहा हा काय दिवस होते ते...अगदी मंतरलेले....Top of the World.. ते पाहू आपण पुढच्या भागात...सावधान होऊन ऐका बर का!!!! तूर्तास अनिरुद्ध पथक विश्राम
धपा धप तीन भाग लिहून झाले....जरा चौथ्या भागासाठी वेळ घेतला...मुद्दामूनच घेतला...कारण आता परेडसारख्याच अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी वळणार आहे....रेस्क्यु प्रॅक्टीस...
परेड काय आहे....आणि रेस्क्यु प्रॅक्टीस काय? याचा मी नेहमी विचार करायचे...यातील जास्त महत्त्वाचे काय? .हा प्रश्न मला एकाने विचारला होता..मला उत्तर तेव्हा देता आले नाही...पण आज मी हे उत्तर देते...माझ्यामते, परेड आणि रेस्क्यू प्रॅक्टीस ही दोन्ही ए ए डी एमची विभक्त नसलेली जुळी बाळे आहेत...एकाशिवाय दुसरे राहू शकत नाही...दोघेही एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी एका डीएमव्हीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फक्त थॊडासा फरक जर करायचा झाला तर परेड हे साध्य नाही...साधन आहे...तर रेस्क्यु प्रॅक्टीस किंवा रेस्क्यु हे साध्य आहे...मी परेड का करायची तर....रेस्क्यु ऑपरेशनसाठी सदैव फिट रहावे म्हणून....म्हणजे जस आपल्या देशाचे सैनिक सीमेवर लढतात...ते त्यांचे कार्य असते...अगदी तसच...DMV चे आहे...अस मला वाटत...ते सीमेवरील आपत्तीशी लढतात....आपले काम सीमेआत येणार्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीशी लढणे आहे...आता लढणे म्हणजे आगाऊपणा करत पुढे पुढे करण आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं नाही...तर आपल्या सरकारी यंत्रणांना (पोलीस द्ल, अग्नीशामक दल इत्यादी) त्यांच्या कामात पूर्ण सहकार्य करणं...कोणतीही आपत्ती उदभवू नये याची दक्षता घेणं...हे सगळ मी या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून करायच...आणि ते उचित पद्धतीने करता याव...यासाठी ए ए डी एमचा डी एम व्ही होण गरजेच आहे....नाही तर काही तरी वेड्यासारख करायच आणि आपत्ती निवारण करण्या ऐवजी आपत्ती वाढवून ठेवायची...याच सगळ्यात मोठ्ठ आणि तापदायक उदाहरण म्हणजे "अफवा" पसरविणे....असो...मला काय म्हणायचे ते कळलेच असेल तुम्हाला...नसेल तर यावर आपण पुन्हा कधी तरी सविस्तर बोलू...आता वळूया आमच्या भन्नाट रेस्क्यू प्रॅक्टीसकडे....
तर परेडच्या रेस्क्यु प्रॅक्टीसकडे वळण्याआधी केंद्रावरील रेस्क्यु सरावाची थोडीशी मज्जा सांगते...केंद्रावर आमचा ए ए डी एम चा मस्त ग्रुप होता...मला अजूनही आठवतय...सगळे झपाटलेले होतो तेव्हा...मी, आशिष भाई, सुनि ताई, प्रसाद, प्रतिभा, भक्ती, निलेश, पराग इत्यादी...वेड लागल्यासारखा सराव करायचो...हीच आमची वसईची रेस्क्यु मेन टीम होती...आशिष भाई म्हणजे आशिष सोलंकी याने आम्हा सर्वांना बांधून ठेवलेले...अरे बांधून ठेवलेले म्हणजे एकत्र बांधून ठेवलेले...आज सगळे वेगवेगळ्या सेवेत सहभागी झालेले असलो तरिही त्या आठवणि ताज्या आहेत... खूप प्रॅक्टीस करायचो...मी तेव्हा अत्यंत बारीक होते आणि वजनाने तर एकदम फूलच होते...त्यामुळे प्रत्येक प्रॅक्टीसला माझा हमखास बळी जायचा...म्हणजे सर्व जण मला कॅज्युलटी म्हणून वापरायचे...ही झाली केंद्राची रेस्क्यु टीम..दुसरी अजून एक टीम होती...बोरीवली ते विरारमधील अती ऍक्टीव्ह डीएमव्हींची..यामध्ये मला फारशी नावे आठवत नाहीत पण मी, सुनी ताई, प्रसाद, शैलेश धुरी, अनिकेत कोळंबकर, सचिन सरैय्या, निलेश पोवळे असे बरेच जण होतो...अरे काय धम्माल केली आहे आम्ही...बोरीवली ते बोईसर दरम्यान कुठेही ए ए डी एम चा कोर्स असला की जायचो आम्ही...सोबत...अरविंदसिंह नातू (नातू काका), जाधव काका, अशोकसिंह वर्तक हे कधीतरी असायचे मार्गदर्शन द्यायला...सगळे जण या तिघांना जाम टरकायचे..पण हे तिनही काका आम्हाला छान मार्गदर्शन करायचे...खूप शिकायला मिळाले यांच्याकडून...खूप छान मोटीव्हेशन द्यायचे...मला सगळ्यात जास्त भिती नातू काका आणि वर्तक काकांची वाटायची...ते गुगली प्रश्न विचारायचे...ते दिसले की मी लांब पळायची...पण आता नाही घाबरत :). एकदा नातू काकांनी मला विरारला चालेल्या प्रॅक्टीस दरम्यान प्रश्न विचारला..मी त्याचे उत्तर दिले तर त्या उत्तरावर पुन्हा प्रश्न विचारला..बापरे मी नंतर उत्तरच दिले नाही पुढचा प्रश्न येईल या भितीने...प्रश्न नेमका आठवत नाही पण तेव्हा ते म्हणाले होते की एका डीएमव्हीचे G K पक्के पाहीजे...त्याला सगळ्या चालू घडामोडींची माहीती पाहीजे. तेव्हा पासून मी तस स्वतःला शक्य तितके अपडेटेड ठेवायला लागले...आणि त्याचा आत्ता खूप फायद झाला...Thank You Very Much Natu Kaka...त्यानंतर वर्तक काकांनी मला पाणजू येथे झालेल्या कोर्सला प्रश्न विचारला सगळ्यांसमोर...रेश्मा आता तू इतक करतेस सेवा आणि AADM पुढे लग्न झाल्यावर काय करणार? तुझ्या नवर्याने नाही पाठवल मग? तेव्हा मला खूप भिती वाटली. खरच अस झाल तर...पण मी ठामपणे उत्तर दिले...नवरा सोडेन बापूंची सेवा नाही....यावर त्यांनी माझ्याशी खूप वाद घातला..(हा वाद माझ्या भल्यासाठीच होता हे मला पक्के ठाऊक होते) पण मी ठाम होते...आजही आहे...पण खरच त्यांनी त्या दिवशी विचारलेल्या प्रश्नाने माझे विचार बदलू लागले...आणि खरच मला काय हवय...आणि काय नकोय याची एक चौकट बनू लागली...पण ही चौकट माझे बंधन नाही बनली...आणि या मर्यादेच्या चौकटीत राहूनच प्रगतीच्या दिशेने माझा जोमाने प्रवास सुरु झाला...जो आजही सुरु आहे..तेव्हा माझे वय १९/२० असेल..हे सगळ सांगायचा मुद्दा असा की, ए ए डी एम आणि परेड या सारख्या सेवांमध्ये फक्त मी सहभागी नाही झाले..तर या सेवा करताना अनेक बाबींतून मी घडत गेले...या सेवे दरम्यान संपर्कात आलेल्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखे होते..ते मी शिकले...त्यामुळे या बापूंच्या कार्यात झोकून दिल्याने माझ कुठही नुकसान झाले नाही. अनेकांनी मला वेड्यात काढले...अगदी नातेवाईकांनी सुद्धा...बापूंच्या सेवेत आणि या नसत्या उद्योगात सहभागी होऊन तुला काय मिळणार आहे? काय उपयोग याचा? अशा प्रश्नांचा भडीमार व्हायचा...पण असे प्रश्न झेलण्याची ताकद बापूंनी दिली. तेव्हा त्यांना मी उत्तरे दिली नाहीत...आणि आज पुन्हा त्यांच्यात हे प्रश्न विचारण्याची हिम्मत नाही...ह्यालाच म्हणतात खरा "बापूंचा चमत्कार"
तर असो,
आम्ही मचाण बांधण्यापासून ते मोडण्यापर्यंतचे आणि या दरम्यान डेमॊ दाखविण्याचे सर्व उद्योग करायचो..सचिन सरैय्या, निलेश, शैलेश, प्रसाद हे सगळे मचाण बांधण्यात पुढे असायचे..एकदा तर सगळे मचाणावर चढलो...आणि पडतय की काय अस झालेल...पण बापू कृपेने नाही पडले...आणि आम्ही सगळे सुखरुप होतो...वसईलाच झालेले हे बहुतेक...आम्ही रेस्क्युच्या काही नविन पद्धती देखील शोधून काढल्या होत्या..अभ्यासक्रमाच्या बाहेरील....हा हा हा....काय भन्नाट डोकी चालायची आमची..केंद्रावर रेस्क्यु प्रॅक्टीस जोरदार चालली होती...मध्येच आम्ही कांदीवलीला एका शाळेत सरावाला जायचो...तिथे त्या बैठ्या शाळेच्या छपरावर जायचो आणि तिथून सेफ जंपचा सराव करायचो...मी एकदाच मारली जंप..बाबारे!!!...लय भिती वाटायची जंप ला...लॅडरने चढणे उतरणे वैगरे...त्यानंतर दहिसरच्या मैदानात सराव सुरु झाला...येथे तर धम्माल यायची..प्रसाद धुमाळी, सत्या..वैगरे दहिसरचे डीएमव्ही येथे एकत्र सराव करायचो...
इकडची एक गम्मत आठवतेय...दहिसरचे हे ग्राऊंड जरा गवताळ होत...त्यामुळे इथे सराव करताना फार प्रसन्न वाटायच...रात्री ७ / ७:३० नंतर सराव चालायचा. आम्ही इथे कॅज्युलटीला स्ट्रेचरवर घ्यायचो त्या ग्राऊंडला चक्कर मारायचो. एक किंवा दोन..मला हे सगळे सारखे कॅज्युलटी बनवायचे...त्यामुळे इथे माझा सराव कमीच व्हायचा...खर सांगू मी कुणाला उचलू शकेन अस कुणीच नव्हत तिथे...आणि मी परेफेक्ट कॅज्युल्टी असायची....डीएमव्हीला अजिबात सहकार्य न करणारी...अंगच टाकून द्यायची मी मला हॅण्डल करणार्या डीएमव्हीवर...मग मज्जा यायची त्यांची...असो...तर एकदा सगळ्या मुलींनी मला रोप स्ट्रेचरवर उचलले. त्यांनी बरोबर उचलले नव्हते...एक राऊंड झाल्यानंतर त्यांनी मला खाली ठेवले. खाली ठेवताना माझ डोक आपटले...माझा श्वासोच्छावास बंद होता..अंग थंड पडले होते...डोळे वर गेले होते...ठेवल्यानंतर मी उठेनाच...सगळे घाबरले...भक्ती हरचेकर माझी चुलत चुलत बहीण ही माझ्या डोक्याजवळ होती स्ट्रेचर धरायला. ती घाबरली. तीने मला गदा गदा हलविले मी उठली नाही...बाकीच्यांनी हात पाय चोळायला घेतले..भक्ती खूप घाबरली..शेवटी तिने थोबाडीत मारायला सुरुवात केली मला. एक...दोन...तीन..फटाफट...दहा तरी मारल्या असतील तिने...शेवटी मला सहन नाही झाले....आणि मी म्हटल बस!!!! आले मी शुद्धीवर...आणि हसायला लागले..हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
मी नाटक करीत होते..पाचच मिनिटाचे होते...पण सगळ्यांचे धाबे दणाणले होते...मी मस्त त्या गवतावर पहडून सगळ्यांकडे पाहत होते हसत...सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते..भक्तीचे पाण्याने डबडबले डोळे पाहून मला हसूच आवरेना...मग माझी वाट लागली...सगळ्यांनी असले धुतलय मला!!!...भक्तीने तर गळाच धरला..सुनिताईने चांगलेच धपाटे घातले...मुलांनी तर त्यांच्या वतीने माझ्या कमरेत लाथ घालायला सांगितली..तुडव तुडव तुडवला मला..आणि वॉर्निंग दिली..पुन्हा अस करायच नाही...सगळ्या डीएमव्हींची..हुशार डीएमव्हीची तेव्हा फाटली होती..मला जाम हसू येत होत..मग सगळे शांत झाल्यावर मी त्यांना म्हटल तुम्ही सगळ्यांनी चुकीच्या पद्धतीने मला उचलल होत...त्यामुळे माझा पाठीचा कणा कामातून गेला असता..शिवाय माझ डोक ही आपटल...कितीला पडल असत हे एका कॅज्युलटीला...म्हणून मी मुद्दामुनच नाटक केले...हा हा हा हा...
त्यांना पण हे लक्षात आल...पण पुन्हा मी अस करणार नाही अस वचन दिल्यानंतरच त्यांनी मला माफ केल..मी पण अस पुन्हा कधी केल नाही...नाहीतर लांडगा आला रे आला झाल असत माझ..आणि माझ्याही चुका होतच होत्या की...पण एक गोष्ट यानंतर छान झाली ती म्हणजे मी कॅज्युलटी म्हणून नाकारले जाऊ लागले झाले...कुणीही चालेल रेश्मा नको....हा हा हा....
असो तर अशी धम्माल करीत चालायचा आमचा रेस्क्यु सराव...त्यानंतर माझी निवड परेडच्या रेस्क्यु टीममध्ये झाली...आणि इथे तर सगळ भन्नाटच होत....आहा हा काय दिवस होते ते...अगदी मंतरलेले....Top of the World.. ते पाहू आपण पुढच्या भागात...सावधान होऊन ऐका बर का!!!! तूर्तास अनिरुद्ध पथक विश्राम
Comments
no words to say.... awesome
waiting for next part..
भक्ती खूप घाबरली..शेवटी तिने थोबाडीत मारायला सुरुवात केली मला. एक...दोन...तीन..फटाफट...दहा तरी मारल्या असतील तिने...शेवटी मला सहन नाही झाले....आणि मी म्हटल बस!!!! आले मी शुद्धीवर...आणि हसायला लागले..हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
मी नाटक करीत होते..पाचच मिनिटाचे होते...पण सगळ्यांचे धाबे दणाणले होते...मी मस्त त्या गवतावर पहडून सगळ्यांकडे पाहत होते हसत...सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते..भक्तीचे पाण्याने डबडबले डोळे पाहून मला हसूच आवरेना...मग माझी वाट लागली...सगळ्यांनी असले धुतलय मला!!!...भक्तीने तर गळाच धरला..सुनिताईने चांगलेच धपाटे घातले...मुलांनी तर त्यांच्या वतीने माझ्या कमरेत लाथ घालायला सांगितली
tumhala punha ekada sangavase vatate ki mast hihale aahe..
hari om
3 cheers for your comeback. Restlessly awaiting this Sunday. C u on ground
Reshma ,
Good series of articles for all DMV's tojoin Parade ...Seems we have to make our new DMV's and also old ones about this articles which will inspire them to join parade . Upasana kendran varti ek message circulat kela taar Parade joinees vadu shaktil ,, nakkich ...any media work supported by personal reach does yield more results . will explain u later ..AADM conveners help can be taken ..
Lot of DMV's are unaware of this blogs .yet today which needs to change we need to reach them by emails and invite them to atleast to praticipate in reading blogs ..
One imp thing from this blogs is that it has shown us a more creative way of how we can utilise internet as a positive effective tool for develpoment rather than wasting precious time on useless sites .Replay what u fell wil wait eagerly for ur replay
he sagli ARMY CHI TAYARI AAHE NA ..
HARI OM
KAMLESH